DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

शिवाजीराव आढळराव पाटील 20 वर्षांनंतर स्वगृही राष्ट्रवादीत परतणार!

शिरूरमध्ये पुन्हा अमोल कोल्हेंशी कुस्ती!

DD News Marathi by DD News Marathi
March 23, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
शिवाजीराव आढळराव पाटील 20 वर्षांनंतर स्वगृही राष्ट्रवादीत परतणार!

पुणे प्रतिनिधी :
दि. २३ मार्च २०२४

 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला असून, येत्या 26 मार्च रोजी ते राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधतील. खुद्द आढळराव पाटील यांनीच याबाबत माहिती दिली आहे. तब्बल वीस वर्षांनंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांचं स्वगृही परतणं होणार आहे. शिरूरमधून ते राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी असेल.

शिवाजीराव आढळराव पाटील हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते होते. आंबेगाव तालुक्यात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांची अतूट मैत्री होती हे सर्वश्रुत आहे. त्या दरम्यान आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांना २००४ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खेड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, त्यावेळचे खासदार अशोकराव मोहोळ यांनाच पक्षाने तिकीट दिले होते. त्यामुळे आढळराव पाटील यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादीत परत येत आहेत.

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत आढळराव म्हणाले,” प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा राष्ट्रवादीत येत्या 26 तारखेला सायंकाळी प्रवेश होणार हे निश्चित आहे. प्रवेशासंदर्भात माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. तसंच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झालं आहे. या दोघांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे, त्यामुळे माझ्या पक्षप्रवेशाला महायुतीच्या नेत्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे.”

आढळराव पुढे म्हणाले, “माझा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे, त्यामुळे उमेदवारी निश्चित होणार का, असा प्रश्नच येत नाही. कारण घड्याळ्याच्या चिन्हावर मीच शिरूरमधून निवडणूक लढविणार हे नक्की आहे. मागील लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मी उभा राहणार आहे. शिरूरमधून माझा विजय होईल, याची मला शंभर टक्के खात्री आहे.”

ते पुढं म्हणाले, “माझं जे गणित आहे, त्यानुसार पहिली निवडणूक मी तीस हजार मतांनी तर दुसरी निवडणूक एक लाख 80 हजार मतांनी जिंकलो. तिसरी तर तीन लाखांनी जिंकलो होतो. आगामी निवडणूक ही सर्व रेकॉर्डस तोडणारी असेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.” पंतप्रधान मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आपण प्रयत्न करणार आणि सर्व उमेदवार जिंकतील, असा विश्वासही आढळराव पाटील यांनी बोलून दाखवला.

राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार पळवला, असं काही नाही. मी महायुतीमधलाच उमेदवार आहे, असेही आढळराव यांनी नमूद केले. दरम्यान, शिरूरमधून महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी घोषित झाली आहे, त्यामुळे शिरूरमध्ये पुन्हा आढळराव विरोधात कोल्हे असाच सामना रंगणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #NCP#puneloksabhaelections ##shirur#shivajiraoadhalraopatil
Previous Post

गिरीश बापट म्हणत असणार यांना मतदान करू नका.

Next Post

हर्षवर्धन पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी खडसावले?

Next Post
हर्षवर्धन पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी खडसावले?

हर्षवर्धन पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी खडसावले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026

अजित पवारांनी माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले

January 31, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.