DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आता तीन दिवस उष्णतेची लाट…काळजी घ्या!

हवामान विभागाचा इशारा!

DD News Marathi by DD News Marathi
April 5, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0

पुणे प्रतिनिधी :
दि. ०५ एप्रिल २०२४

एकीकडे तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मात्र पुढील तीन दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावरून गुजरातकडे आर्द्रतायुक्त उष्ण वारे वाहात आहेत. चक्रवाताच्या स्थितीमुळे हे घडते आहे.

ह्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात वेगाने बदल होताना दिसत आहेत. हवामान विभागाने मुंबई पालघरसह कोकणाच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई शहरासह पालघरमध्ये तसेच रायगड, ठाणे या ठिकाणीही हवेतील आर्द्रता वाढणार आहे. त्याच्या परिणामस्वरूप या भागातील उकाडा वाढणार आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या शहरांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येणार आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुपारी, विनाकारण, काम नसताना घराबाहेर पडू नये, सतत पाणी प्यावे, त्रास होतोय असे वाटल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हवेची एक द्रोणीय रेषा वातावरणाच्या खालच्या स्तरात म्हणजे दक्षिण तमिळनाडू ते आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत तयार झाली आहे. विदर्भावरून ही द्रोणीय रेषा जाते. तसेच एक प्रती चक्रावाताची स्थिती अरबी समुद्रावर तयार झाली आहे. पुढील तीन दिवस वातावरणाच्या या स्थितीमुळे विदर्भात तापमानात वाढ होईल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. प्रामुख्याने यवतमाळ, अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेच्या लाटेचा परिणाम जास्त होण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भात कमाल-किमान तापमानात वाढ होऊन रात्री उकाडा वाढण्याचाही अंदाज आहे.

चक्रावाताच्या स्थितीमुळे आर्द्रतायुक्त उष्ण वारे, अरबी समुद्रावरून गुजरातकडे वाहात आहेत. हे वारे गुजरातवरून महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे येत असल्याने पुढील चार-पाच दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमानात वाढ होणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ArabianSea#HeatWave#Vidarbha
Previous Post

मृण्मयी देशपांडेला इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका!

Next Post

कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा सुटणार!

Next Post
कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा सुटणार!

कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा सुटणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.