DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

महाविकास आघाडीची जागावाटपात चूक!

हा आहे चव्हाणांनी सांगितलेला फॉर्म्युला!

DD News Marathi by DD News Marathi
April 9, 2024
in राजकीय
0
महाविकास आघाडीची जागावाटपात चूक!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ एप्रिल २०२४

गेले काही दिवस महाविकास आघाडीत जागावाटपावरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. विशेषत: टोकाचे मतभेद शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीची भिवंडीची मागणी होती, तर दुसरीकडे शिवसेनेने परस्परच सांगलीचा उमेदवार जाहीर करून टाकला होता. मुंबईच्या जागांवरूनही काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. यातच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

“महाराष्ट्रात जागा वाटपामध्ये चुका झाल्या. वाटप करताना आधी मतदारसंघ ठरवायला हवा होता आणि तिन्ही पक्षांना प्रत्येक विभागात किमान एक जागा मिळावी या हेतूने फॉर्म्युला निश्चित करायला हवा होता,” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

याबरोबरच या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या घेणं आवश्यक होतं. मतदार संघ आणि उमेदवार या दोन्ही गोष्टी एकत्र ठरवल्याने साहजिकच गोंधळ उडाला. पक्षाच्या समन्वय समितीच्या हातातून हा विषय आता गेलेला आहे कारण उमेदवारच मतदारसंघावर दावा करू लागले आहेत . ज्या काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या. विशेषतः सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागा नक्की करताना चुका झाल्या. सांगली, दक्षिण मध्य मुंबईबाबत काही मार्ग निघण्याची शक्यता आहे. जे काही असेल ते थोडेफार मान्य करुन आम्ही पुढे जावू.”

देशात ‘इंडिया’ आणि राज्यात महाविकास आघाडीबरोबर जागा वाटपाची चर्चा झाली तेव्हा काँग्रेस बॅकफूटवर होती का? या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारमध्ये नितीश कुमार हे बरोबर न आल्यानं मोठा झटका ‘इंडिया’ आघाडीला निश्चितच बसला आहे. ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार एकत्र आल्याने जो फरक पडला असता, तो फायदा आता मिळणार नाही. बंगाल आणि बिहारसह काश्मीरमध्येसुद्धा एकास एक उमेदवार देणं गरजेचं होतं. पण, इंडिया’ आघाडी, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि दाक्षिणात्य राज्यांत’ झाली. आघाडीची शक्यता दिल्लीत आपसोबत कमी होती. परंतु, तिथेही आघाडी झाल्यामुळे काही प्रमाणात यश मिळण्याची शक्यता बळावली आहे.”

महाविकास आघाडीला कसा प्रतिसाद मिळेल? यावर बोलताना चव्हाणांनी म्हटलं, “आम्ही तीन पक्ष एकत्र आल्यावर प्रचंड ताकद तयार होते हे दिसतंच आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात तसेच कसब्याच्या पोटनिवडणुकीत आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. ईडी, सीबीआयच्या कारवाईमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार गेले असले तरी लोक त्यांच्या मागे गेले नाहीत. आम्हां तिन्ही पक्षांचे जमिनीवरील संघटन मजबूत आहे.”

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AshokChavan#Maharashtra#MahavikasAghadi
Previous Post

शिवतारेंचा एक असाही यू टर्न!

Next Post

दक्षिण मुंबईत ठाकरे शिवसेनेचा उमेदवार रोखण्यासाठी भाजपची खेळी.

Next Post
दक्षिण मुंबईत ठाकरे शिवसेनेचा उमेदवार रोखण्यासाठी भाजपची खेळी.

दक्षिण मुंबईत ठाकरे शिवसेनेचा उमेदवार रोखण्यासाठी भाजपची खेळी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.