DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

स्व.आमदार भारत भालके यांचा फोटो पाण्यात ठेऊन केले जलपूजन

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यातः अनोखी श्रद्धांजली

DD News Marathi by DD News Marathi
May 24, 2021
in ताज्या बातम्या
0
स्व.आमदार भारत भालके यांचा फोटो पाण्यात ठेऊन केले जलपूजन

पुणे प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी.
दि. २४ मे २०२१

मंगळवेढा तालुक्यासाठी महत्वपुर्ण आणि स्वर्गिय आमदार भारत नाना भालके यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढ्यात नुकतेच दाखल झाले आहे. आसबेवाडी ता. मंगळवेढा येथे हे पाणी दाखल झाल्यावर शेतकरी बांधव व बालगोपाळांनी भारत नाना भालके यांच्या प्रतिमेचे पुजन करुन जलपुजन केले. हे जलपूजन करुन शेतक-यांनी भालके यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिलेला हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या कडा ओल्या झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर येत आहेत.

जसे भारत नाना भालके यांचे स्वप्न त्यांच्या पश्चात पुर्ण झाले तसेच चातका प्रमाणे पाण्यासाठी तीन तीन पिढ्या वाट पाहणा-या लहान थोरांपासून सर्वांनी आनंद व्यक्त केला. भालके यांच्या पश्चात त्यांचे अश्वासन पूर्ण करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. तूम्ही आमचा उमेदवार निवडून द्या आम्ही पाणी शेतात आणायची व्यवस्था करतो असा शब्द नुकत्याच झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीच्या निमित्ताने अजित पवार व जयंत पाटील जनतेला दिला होता. मात्र, शेवटच्या दोन दिवसात झालेल्या चमत्कारामूळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा अल्पशा मतांनी पराजित झाला. तरी ही जयंत पाटील यांनी दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलेला शब्द अखेर पूर्ण केला.

जयंत पाटील यांनी भारत नाना भालके यांचे व शेतकरी बांधवांचे स्वप्न पूर्ण केल्याची तालुकाभर चर्चा रंगली आहे. या भागातील शेतक-यांच्या जीवनात पुन्हा गंगा आली आता दुष्काळ हटणार अशी भावना निर्माण झाली आहे. अखेर, भारत भालके यांच्या पाश्चत तालुक्यातील पाणी प्रकल्प मार्गी लागत आहेत, याचेच या दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना समाधान असल्याचे त्यांच्या चेह-यावरुन दिसून येत होते.

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

कोरोना योद्ध्यांच्या मदतीला धावून आले अभिजीत साळवे

Next Post

ब्लॅक फंगस आजाराचा सामना करण्यााठी पुरंदरमध्ये उभी राहतेय ग्रामनिधीची चळवळ

Next Post

ब्लॅक फंगस आजाराचा सामना करण्यााठी पुरंदरमध्ये उभी राहतेय ग्रामनिधीची चळवळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.