DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालयानं मोदींची याचिका फेटाळली!

हायकोर्टाकडून महायुतीला मोठा दिलासा.

DD News Marathi by DD News Marathi
January 11, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
मुंबई उच्च न्यायालयानं मोदींची याचिका फेटाळली!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ११ जानेवारी २०२५

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन वाद पेटला होता. आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं महायुती सरकारला दिलासा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुनील मोदी यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका अयोग्य असल्याचा निकाल न्यायालयानं दिला आणि ही याचिका फेटाळून लावली.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गाजला होता. सरकारकडून १२ जणांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवली होती. पण त्यांनी त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत यादीवर स्वाक्षरीच केली नाही. त्यामुळे १२ जणांची यादी अखेरपर्यंत लटकली. त्या प्रकरणात शिवसेना उबाठाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख सुनील मोदींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी यादी देणं हा सरकारचा घटनात्मक अधिकार आहे, असा दावा मोदींच्या वकिलांकडून करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयानं राज्यपालांच्या भूमिकेबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली. पण राज्यपाल घटनात्मक पदावर असल्यानं आम्ही त्यांना निर्देश देऊ शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलं.

२०२२ मध्ये ठाकरे कोसळलं आणि शिंदे सरकार सत्तेवर आलं. त्यांनी १२ नावांची यादी मागे घेतली. कॅबिनेटच्या मंजुरीनं यादी मागे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे हा निर्णय कायदेशीर आहे, असा युक्तिवाद सरकारच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी तो मान्य केला. त्यामुळे महायुतीला दिलासा मिळाला आहे.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारनं १२ पैकी ७ जागांवर नियुक्त्या केल्या. राज्यपाल कोट्यातील ७ जागा भरण्यात आल्या. यातील तिघांची वर्णी भाजपकडून लागली. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी २ जण विधान परिषदेचे आमदार झाले. आता उच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानं अन्य ५ जागा भरण्याचा मार्गदेखील मोकळा झाला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #EkanathShinde#Mahayuti#Modi#SunilModi#UddhavThackeray
Previous Post

मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप!

Next Post

सुसंवाद नसेल तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही!

Next Post
सुसंवाद नसेल तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही!

सुसंवाद नसेल तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

December 9, 2025
कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.