DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सामन्यात अक्षरचे पाय धरण्यासाठी विराटने घेतली धाव!

किंग 'बापू' च्या पाया पडायला का धावला?

DD News Marathi by DD News Marathi
March 3, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
सामन्यात अक्षरचे पाय धरण्यासाठी विराटने घेतली धाव!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. ०३ मार्च २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटचा साखळी सामना हा भारत आणि न्यूझीलंड संघामध्ये रंगला. भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २४९ धावांचा डोंगर उभा केला. २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ फक्त २०५ धावांवरच बाद झाला. या सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली अक्षर पटेलच्या पायांना स्पर्श करू लागला. विराटने असे का केले यामागे एक मोठे कारण आहे.

आता प्रश्न असा आहे की विराटने असे का केले? खरं तर, २५० धावांचा पाठलाग करताना, न्यूझीलंड संघ एकेकाळी सामन्यावर नियंत्रण मिळवत होता. विशेषतः केन विल्यमसन क्रीजवर खंबीरपणे उभा होता, तो ८१ धावा काढून खेळत होता. पण अक्षरने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर केन विल्यमसनला बाद केले आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अक्षरच्या उडत्या चेंडूवर विल्यमसन पुढे आला आणि त्याने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण विल्यमसन चुकला आणि मागे उभ्या असलेल्या केएल राहुलने त्याला यष्टीचीत केले.

विल्यमसनच्या विकेटवर विराट कोहली सर्वात जास्त उत्साहित दिसला. विराट इतका आनंदी झाला की तो धावत जाऊन अक्षर पटेलचे पाय धरु लागला. दरम्यान, अक्षरही हसत कोहलीला थांबवताना दिसला. नंतर दोघेही मैदानात बसून हसू लागले. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपली शानदार कामगिरी सुरू ठेवत, टीम इंडियाने तीन सामन्यांत सलग तिसरा विजय नोंदवला. प्रथम, टीम इंडियाने बांगलादेशला ६ विकेट्सने हरवले, त्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानवरही ६ विकेट्सने विजय मिळवला. आता न्यूझीलंडला ४४ धावांनी पराभूत केल्यानंतर, संघाने कोणताही सामना न गमावता उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुढे, टीम इंडियाला ४ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल खेळायची आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AksarPatel#ICCchampionstrophy2025#IndvsNewZealand#ViratKohli
Previous Post

दत्ता गाडेचा अक्षय शिंदेसारखा एन्काऊंटर होणार?

Next Post

अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा!

Next Post
अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा!

अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.