DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आम्हा तिघांची प्रत्येक निर्णयाची जबाबदारी!

देवेंद्र फडणवीसांनी दिले 'त्या' चर्चांना नेमके उत्तर.

DD News Marathi by DD News Marathi
March 8, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
आम्हा तिघांची प्रत्येक निर्णयाची जबाबदारी!

मुंबई प्रतिनिधी :
दि. 08 मार्च 2025

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच विधानसभेत बोलताना दिसले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील जनतेने महायुतीमधील पक्षांवर खूप मोठा विश्वास दाखवला. आज छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील ते आपल्या सर्वांचेच दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आदर असलेले हे सरकार आहे. आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला दाखले मागितले नाहीत. आमचा विश्वास आहे की, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सर्व आहोत.

पुढे फडणवीस म्हणाले की, स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाहीये. यापूर्वी देखील मी स्पष्ट केले की, जे जे राज्याच्या हिताचे आहे, ते ते सुरू करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरूवातीला मी होतो नंतर दादाही होते. त्यामुळे घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी एकट्या शिंदेंची नाही तर तिघांची आहे. ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या. त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलीये. सरकार आपणही चालवलंय बऱ्याचदा खालच्या स्तरावर गडबडी होतात.

विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरीही देवेंद्र फडणवीसांचा दणका, खात्याच्या मंत्र्याने जरी स्थगिती दिली तरीही फडणवीसांचा शिंदेंना दणका, असं बोललं जातं. “एक गोष्ट सांगतो की, दादांचे काय आहे ते थेट अटॅक करतात ना…त्याच्यामुळे फार कोणी त्यांच्या वाटं जात नाही. एक गोष्ट सांगतो की, हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही जेही निर्णय घेत आहोत, ते तिघे मिळून घेतो. काही बैठकांना दादा असतात काही बैठकांना शिंदे साहेब असतात”.

कधी दोघेही असतात. मात्र, जो आला नाही तो नाराज असल्याचे सांगितले जाते. पुढे फडणवीस म्हणाले की, १ लाख ३० हजार ग्राहकांनी रूफटॉप सोलर लावली. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वीज खरेदीचा दर आपण कमी केला. ९५ टक्के ग्राहकांना वीज दरात दिलासा मिळाला. स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या वीजेत १० टक्के सूट देण्याचा प्लॅन असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitDadaPawar#DevendraFadanavis#EknathShinde#UddhavThackeray
Previous Post

मुंबईला महाराष्ट्रातून तोडायचा भाजपाचा डाव!

Next Post

जयकुमार गोरेंच्या प्रतिकाला साडीचोळीचा आहेर!

Next Post
जयकुमार गोरेंच्या प्रतिकाला साडीचोळीचा आहेर!

जयकुमार गोरेंच्या प्रतिकाला साडीचोळीचा आहेर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

१०० स्पा सेंटरच्या नावाखाली पुण्यात सर्रास देहविक्री!

July 30, 2025
एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

एलियन्स लवकरच पृथ्वीवर उतरण्याची शक्यता?

July 29, 2025
सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

सलमान खानसोबत शूटिंग अन् अशोक सराफांचा जीव धोक्यात!

July 29, 2025
“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

“भिक्षा नको, शिक्षा द्या” मोहिम राबविली जाणार!

July 29, 2025
गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

गाडीने दोन पलट्या खाल्ल्या, पण वाहातूक पोलिस ठरला देवदूत!

July 29, 2025
उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर जाण्यास सज्ज?

July 29, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.