DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ब्रेकिंग न्युजः महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला

जिल्हाबंदी १० जुन पर्यंतः खाजगी व सरकारी कार्यालये ५० सुरु राहणार

DD News Marathi by DD News Marathi
May 30, 2021
in ताज्या बातम्या
0
ब्रेकिंग न्युजः महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला

मुंबई प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी

दि.३० मे २०२१

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. तेंव्हा, महाराष्ट्रात 1 जूननंतरही लॉकडाऊन वाढवला जाणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिले आहेत.

राज्यातील 21 जिल्ह्यांत कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अजून ही वाढ होत आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही. राज्यात 1 जूननंतरही निर्बंध कायम ठेवले जातील. त्याबाबत मंत्रिमंडळाचं एकमत झालं असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यामध्ये काही शिथिलता देण्याचा सरकार निश्चितपणे विचार करीत आहे. तेंव्हा, महाराष्ट्रातील सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विशेष करुन ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता आता असलेले सर्व निर्बंध तसेच ठेवावेत असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंधांमध्ये शिथिलता करावी अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे. परिणामी, आता राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. तसेच, 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

इतर राज्यांतील लॅाकडाऊन विषयी धोरण.

महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि गोवा या राज्यांतील कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन किंवा इतर निर्बंध पुढील पंधरा दिवसांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दिल्ली, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

आता पुढचा नंबर अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांचा

Next Post

सामाजिक सेवा प्रतिष्ठान व रुपाली वांबुरे यांच्यातर्फे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
सामाजिक सेवा प्रतिष्ठान व रुपाली वांबुरे यांच्यातर्फे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन

सामाजिक सेवा प्रतिष्ठान व रुपाली वांबुरे यांच्यातर्फे वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.