DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी ठरविण्यासाठीच….

संजय राऊतांनी केले मोठे विधान.

DD News Marathi by DD News Marathi
March 31, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी ठरविण्यासाठीच….

मुंबई प्रतिनिधी :
दि. ३१ मार्च २०२५

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी नागपूर दौरा झाला. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ वर्षांनी संघाच्या मुख्यालयामध्ये गेले. यावेळी मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट झाली. या दौऱ्याबाबत बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा वेळ आता संपला असून पुढचा वारसदार ठरवण्यासाठी चर्चा केल्याचा दावा केला आहे.

मोदींचे पुढचे वारसदार राष्ट्रीय स्वसंसेवक संघ ठरवेल असं दिसत आहे. म्हणूनच मोदींना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, ती बाहेर येत नाही. तरीही संकेत स्पष्ट असतात. संघ ठरवेल पुढचा नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल, असं मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे.

सप्टेंबरमध्ये निवृत्तीचा अर्ज लिहिण्यासाठी कदाचित ते संघ मुख्यालयात गेले असावेत. मला जी माहिती आहे त्यानुसार मोदी गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये गेले नाहीत. आता मोहन भागवत यांना सांगण्यासाठी गेले की टाटा बाय बाय मी जात आहे. संघाच्या दोन गोष्टी आहेत, ज्या माझ्या लक्षात आल्या आहेत. मोहन भागवत आणि संघ परिवार आता देशाच्या नेतृत्त्वात त्यांना बदल हवा आहे. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षही त्यांच्या मर्जीचा निवडायचा आहे त्यासाठी मोदी तिथे गेले होते. मोदी आता जात आहेत. या भेटीचे संकेत स्पष्ट आहेत की, मोदींनी जाहीर केलेल्या धोरणानुसार ७५ वर्षे झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी चर्चा केली असावी. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची भूमिका आहे असं समोर आलं आहे. ज्या अर्थी दहा-अकरा वर्षांनी नागपूरात जाऊन मोदींना सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. ४०० पारसाठी जे.पी. नड्डा यांनी संघाची गरज नसल्याची भाषा केली होती. जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा तेव्हा पंतप्रधान मोदींची भूमिका असते. त्यामुळे मोदींना का यावं लागलं हे समजून घ्या, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ModiSuccessor#MohanBhagwat#Nagpur#NarendraModi#RSS#SanjayRaut
Previous Post

हर्षवर्धन सपकाळांनी पुण्यातल्या आपल्या ४ शिलेदारांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली!

Next Post

आज लोकसभेत सादर होणार वक्फ संशोधन विधेयक!

Next Post
आज लोकसभेत सादर होणार वक्फ संशोधन विधेयक!

आज लोकसभेत सादर होणार वक्फ संशोधन विधेयक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.