DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पाकच्या विनंतीवरून भारताकडून शस्त्रसंधी!

तणाव संपला, आता १२ मे ला महत्त्वाची बैठक.

DD News Marathi by DD News Marathi
May 10, 2025
in ताज्या बातम्या, राजकीय
0
पाकच्या विनंतीवरून भारताकडून शस्त्रसंधी!

नवी दिल्ली प्रतिनिधी :
दि. १० मे २०२५

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष अखेर थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं शस्त्रसंधीचा निर्णय घेतलेला आहे. या वृत्ताला पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी दुजोरा दिला आहे. भारतासोबत शस्त्रसंधी झाल्याची माहिती डार यांनी दिली आहे. आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी झालेली आहे. भारत आणि पाकिस्तानचे लष्करी अधिकारी १२ मे रोजी बैठक घेणार आहेत. दोन्ही देशांनी थेट चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं भारताकडून सांगण्यात आलेलं आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरुन सैनिकी कारवाई थांबवल्याचं भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

यासंदर्भात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली की, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्कराच्या महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5 वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सुरु असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्कराचे ऑपरेशन्स महासंचालक 12 मे रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा चर्चा करतील.”

बातमी नक्की शेअर करा
Tags: #CeaseFire#INDIA#OperationSindoor#Pakistan
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा.

Next Post

मुकेश अंबानी यांचेकडून ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा!

Next Post
मुकेश अंबानी यांचेकडून ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा!

मुकेश अंबानी यांचेकडून ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.