DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

भारताच्या एका रणनीतीमुळे सामना फिरला!

सामन्यानंतर शुभमन गिलने रहस्य सांगितलं.

DD News Marathi by DD News Marathi
July 28, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या, देश-विदेश
0
भारताच्या एका रणनीतीमुळे सामना फिरला!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २८ जुलै २०२५

असे म्हटले जात होते की, भारतीय संघ चौथा सामना हारणार. पण भारतीय संघाने टीकाकारांचे तोंड बंद करून, झुंजार फलंदाजी करत सामना ड्रॉ राखला. पण हा सामना भारताने ड्रॉ कसा राखला, याबाबत भारताचा कर्णधार शुभमन गिलने सामना संपल्यावर स्पष्टीकरण दिले. आम्ही एकाच गोष्ट केल्यामुळे आम्हाला या सामन्यात गड कायम राखता आला, असे गिलने सांगितले.

इंग्लंडकडे आघाडी होती ३११ धावांची! त्यात इंग्लंडने भारताचे दोन फलंदाज शून्यावर तंबूत धाडले होते. त्यावेळी इंग्लंड चौथ्या दिवशी सामना जिंकणार असेच सर्वांना वाटत होते. पण त्याचवेळी शुभमन गिल आणि केएल राहुल मैदानात ठामपणे उभे राहीले. दोघांनी संपूर्ण चौथा दिवस खेळून काढला. त्यानंतर पाचव्या दिवशी राहुलचे शतक जरी हुकले, तरी शुभमन गिलने ही कसर भरून काढली आणि १०३ धावांची खेळी साकारली. गिल बाद झाल्यावर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकं झळकावली आणि इंग्लंडला आपल्यापुढे अक्षरशः लोटांगण घालायला लावले. आता हा सामान भारताने कसा फिरवला, हे गिलमे सामना संपल्यावर सांगितले आहे.

गिलने सामना संपल्यावर संगितले की, “गेल्या दोन दिवसांपासून आम्ही पिछाडीवर असल्याने दडपणाखाली होतो. . पण कसोटी सामना ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला बरंच काही शिकवून जाते. नेमकी हीच गोष्ट यावेळी घडली. भारताच्या कामगिरीबाबत मी आनंदी आहे. आम्ही दोन विकेट्स लवकर गमावल्या होत्या. त्यानंतर खेळणे अवघड होते. चौथा दिवस आम्ही खेळून काढल्याने पाचवा दिवस आमच्यासाठी महत्वाचा होता. पाचव्या दिवशी आम्ही प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे हे लक्षात घेतले आणि तो कसा खेळायचा, याचा विचार आम्ही केला. प्रत्येक चेंडूचा आम्ही विचार केल्याने आम्हाला हा सामना ड्रॉ राखण्यात यश आले. फलंदाजांनी खरोखर उत्तम कामगिरी केली आणि त्यामुळेच आम्हाला पाचव्या दिवशीही खेळपट्टीवर टिकून राहाण्यात यश मिळाले.”

बातमी नक्की शेअर करा
Tags: #4thtestmatch#IndVsEngland#Manchester#shubhmangill
Previous Post

पुण्यात आणखी एक रेव्ह पार्टी प्रकरण!

Next Post

ठाकरे बंधू एकत्र लढल्यास भाजपची स्थिती अवघड!

Next Post
ठाकरे बंधू एकत्र लढल्यास भाजपची स्थिती अवघड!

ठाकरे बंधू एकत्र लढल्यास भाजपची स्थिती अवघड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

December 9, 2025
कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.