DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

आयसीसीच्या वनडे क्रमवारीतून रोहित-कोहली गायब!

चाहत्यांना धक्का; काय आहे नेमकं कारण?

DD News Marathi by DD News Marathi
August 20, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
आयसीसीच्या वनडे क्रमवारीतून रोहित-कोहली गायब!

डीडी न्यूज क्रीडा प्रतिनिधी :
दि. २० ऑगस्ट २०२५

आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होताच, आयसीसीने मंगळवारी वनडे बॅट्समन रँकिंग जाहीर केली. मात्र या नव्या रँकिंगमध्ये टीम इंडियाचे दोन प्रमुख चेहरे – कर्णधार रोहित शर्मा आणि वरिष्ठ फलंदाज विराट कोहली – यांचा कुठेही उल्लेख नसल्यानं क्रिकेटप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.

टॉप ५ मधून थेट गायब!

गेल्या आठवड्यातच रोहित आणि विराट अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर होते. रोहितकडे ७५६ गुण होते, तर विराटकडे ७३६. पण केवळ एका आठवड्यात या दोघांची नावं संपूर्ण यादीतूनच गायब झाल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं? नियम की चूक?

आयसीसीच्या नियमानुसार, जर एखादा खेळाडू ९ ते १२ महिने एकदिवसीय सामने खेळलेला नसेल किंवा निवृत्त झाला असेल, तर त्याला रँकिंग यादीतून बाहेर काढलं जातं. पण रोहित आणि विराट हे दोघेही मार्च २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळले होते — ज्याला फक्त पाच महिनेच झाले आहेत. तसेच, त्यांनी वनडे क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केलेली नाही.

तांत्रिक गडबडीची शक्यता

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ही बाब नियमांमुळे नाही, तर तांत्रिक चुकांमुळे घडली असावी. त्यामुळे आयसीसी लवकरच सुधारित रँकिंग जाहीर करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारतीय संघाच्या दोन मोठ्या नावांना रँकिंग यादीतून बाहेर केल्यामुळे क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. चाहत्यांना आणि तज्ज्ञांना आता आयसीसीच्या अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #ICC#ICCranking#RohitSharma#ViratKohli
Previous Post

ठाकरे बंधूंच्या युतीचा फज्जा, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकही जागा नाही!

Next Post

बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंची ‘वर्षा’वर फडणवीसांशी गुप्त चर्चा!

Next Post
बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंची ‘वर्षा’वर फडणवीसांशी गुप्त चर्चा!

बेस्ट पतपेढी निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरेंची 'वर्षा'वर फडणवीसांशी गुप्त चर्चा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.