DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

दौंड तालुक्यातील सहजपूरच्या उमेश म्हेत्रे यांची उपराष्ट्रपतीपदासाठी धाडसी उमेदवारी!

तरुण उमेदवाराच्या प्रवेशाने राजकीय वर्तुळात चैतन्य; ग्रामस्थांमध्ये अभिमान

DD News Marathi by DD News Marathi
August 23, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, राजकीय
0
दौंड तालुक्यातील सहजपूरच्या उमेश म्हेत्रे यांची उपराष्ट्रपतीपदासाठी धाडसी उमेदवारी!

पुणे प्रतिनिधी :
दि. २३ ऑगस्ट २०२५

भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातून आणखी एका उमेदवाराने अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील तरुण उमेश म्हेत्रे यांनी थेट देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवारी दाखल करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उमेश म्हेत्रे यांनी राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तसेच उमेदवारीसाठी आवश्यक असलेले १५,००० रुपयांचे डिपॉझिटही त्यांनी भरले आहे. हे सगळं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच घडल्याने राजकीय चर्चांना अधिकच रंग चढला आहे.

संविधानाच्या निकषांची पूर्तता

भारतीय संविधानानुसार उपराष्ट्रपतीपदासाठी ३५ वर्षे वय पूर्ण असणे आवश्यक असते. त्याचबरोबर २० प्रस्तावक आणि २० अनुमोदकांची पाठराखण असणे बंधनकारक आहे. उमेश म्हेत्रे यांनी हे सर्व निकष पूर्ण केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना असून, सामान्य युवकही सर्वोच्च पदांसाठी पुढे येऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

गावाच्या सीमांना ओलांडलेली धडपड

उमेशच्या या पावलामुळे सहजपूर गाव आणि दौंड तालुका राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या तरुणाने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देणे ही अत्यंत दुर्मीळ बाब मानली जाते. त्यामुळे उमेशचे हे पाऊल तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

इतर उमेदवारांची नावे आणि निवडणुकीची पार्श्वभूमी

या निवडणुकीत एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर ही निवडणूक होणार असून, ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे.

उमेश म्हेत्रे यांची उमेदवारी वैध ठरते का आणि ते या निवडणुकीत काय भूमिका बजावतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र, त्यांच्या या निर्णयाने लोकशाहीच्या दृष्टीने एक सकारात्मक आणि प्रेरणादायी पायवाट नक्कीच उघडली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #daund#Maharashtra#VicePresidentofIndia
Previous Post

टिकटॉक भारतात पुन्हा येणार?

Next Post

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! दिवाळी पर्यंत थांबा!

Next Post
घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! दिवाळी पर्यंत थांबा!

घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! दिवाळी पर्यंत थांबा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.