DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सरकारची जरांगेंचा मोर्चा थोपवण्याची धडपड! मुख्यमंत्र्यांचा खास प्रतिनिधी भेटीसाठी!

जरांगेंची भूमिका ठाम.

DD News Marathi by DD News Marathi
August 26, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
सरकारची जरांगेंचा मोर्चा थोपवण्याची धडपड! मुख्यमंत्र्यांचा खास प्रतिनिधी भेटीसाठी!

जालना प्रतिनिधी :
दि. २६ ऑगस्ट २०२५

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सरकारची चिंता वाढली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल होण्याची शक्यता लक्षात घेता, सरकारने संकट टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) राजेंद्र साबळे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. उपोषण पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

राजेंद्र साबळे हे आज दुपारी साधारणतः १२ वाजता अंतरवालीत पोहोचले. त्यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत होणारी गर्दी, सुरक्षेची संभाव्य अडचण या गोष्टींचा उल्लेख करत, उपोषण काही दिवसांनी घ्यावे, अशी विनंती केली. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं जाईल, तेव्हाच काही विचार करू, अन्यथा आम्ही नियोजित वेळेनुसारच मुंबईकडे मार्गस्थ होणार आहोत, असा निर्वाणीचा इशारा दिला.

“उपोषणाचा कालावधी पुढे ढकलण्याची विनंती करण्यासाठी आणि अंतरवाली ते मुंबई मार्गाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी मी या भेटीला आलो होतो,” असं राजेंद्र साबळे यांनी स्पष्ट केलं. परंतु, जरांगे यांनी मात्र आपल्या मागण्या मान्य न झाल्यास कोणतीही माघार घेणार नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही शांततेत आणि लोकशाही मार्गाने उपोषण करू इच्छितो. मुंबईतील कोणत्याही गणेश मंडळाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण होणार नाही. आझाद मैदानात गणेश विसर्जन होत नाही, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. सरकारने आम्हाला जो मार्ग सांगेल, त्या मार्गाने आम्ही येऊ.”

दरम्यान, जरांगे यांची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे राजेंद्र साबळे यांनी सांगितले. आता पुढील काही तासांत सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #azadmaidan#DevendraFadnavis#manojjarange
Previous Post

दिवाळीचा डबल दिलासा! सामान्यांसाठी आनंदवार्ता!

Next Post

खराडी ड्रग्ज प्रकरणात खेवलकर अडचणीत; पुरावे नष्ट करण्याचा आरोप!

Next Post
खराडी ड्रग्ज प्रकरणात खेवलकर अडचणीत; पुरावे नष्ट करण्याचा आरोप!

खराडी ड्रग्ज प्रकरणात खेवलकर अडचणीत; पुरावे नष्ट करण्याचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.