DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“पाकिस्तानचं डिवचणं सहन झालं नाही, मग मीही उत्तर दिलं!” – अभिषेक शर्मा

 सामना संपल्यानंतर केला खुलासा.

DD News Marathi by DD News Marathi
September 22, 2025
in क्रीडा, ताज्या बातम्या
0
“पाकिस्तानचं डिवचणं सहन झालं नाही, मग मीही उत्तर दिलं!” – अभिषेक शर्मा

मुंबई प्रतिनिधी :

२२ सप्टेंबर २०२५ :

दुबईत सुरु असलेल्या आशिया कप २०२५ च्या सुपर-४ टप्प्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून दमदार विजय मिळवला. १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने केलेल्या आक्रमक खेळीने सामन्याचे पारडे भारताकडे झुकवले.

सामना संपल्यानंतर अभिषेक शर्माने पाकिस्तानच्या खेळाडूंबाबत उघडपणे प्रतिक्रिया दिली. “सामन्यादरम्यान पाकिस्तानचे काही खेळाडू उगाच डिवचत होते. मला ते अजिबात पटले नाही, म्हणून मग मीही त्यांच्या मागेच लागलो,” असं तो म्हणाला. त्याने पुढे सांगितले की, “शुभमनसोबत अशी भागीदारी करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. संघाच्या पाठिंब्यामुळे मी आक्रमक खेळ करू शकतो, जरी त्यात धोका असला तरी.”

भारताने १९.१ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. अभिषेक शर्माने केवळ ३९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह ७४ धावा फटकावल्या. शुभमन गिलने ४७, तर तिलक वर्माने नाबाद ३० धावा करून भारताचा विजय सुनिश्चित केला. अभिषेक शर्माला सामन्याचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.

पाकिस्तानकडून हारिस राऊफने २६ धावांत २ गडी बाद केले, तर फहीम अश्रफने ३१ धावांत १ गडी बाद केला, पण भारतीय फलंदाजांच्या आक्रमणास ते रोखू शकले नाहीत. विशेष म्हणजे, या सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता सामन्याचा शेवट केला.

सुपर-४ मध्ये भारताने विजयाने सुरुवात करताच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #abhisheksharma#AsiaCup2025#indiavspakistan
Previous Post

नेत्याच्या बॅगेत सापडले रिव्हॉल्वर; पुणे विमानतळावर खळबळ!

Next Post

स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीत गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा!

Next Post
स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीत गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा!

स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीत गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.