DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“शासन तुमच्यासोबत ठाम उभं आहे, चिंता करू नका” – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे.

कृषीमंत्री भरणे यांचा नुकसानग्रस्तांना धीर.

DD News Marathi by DD News Marathi
September 25, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
“शासन तुमच्यासोबत ठाम उभं आहे, चिंता करू नका” – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे.

जालना प्रतिनिधी :
दि. २५ सप्टेंबर २०२५

जालना जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या मोठ्या नुकसानीची पाहणी करताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, “काळजी करू नका, शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे.”

बदनापूर तालुक्यातील सोमठाणा व अंबड तालुक्यातील ढाकलगाव परिसरातील शेती शिवारात स्वतः जाऊन मंत्री भरणेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर थेट भेट देत त्यांनी त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. या वेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

माध्यमांशी बोलताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक हातातून गेले आहे. विशेषतः कपाशी, सोयाबीन यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही भागांमध्ये घरांची पडझड व जनावरांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, हे शासनाचे धोरण आहे.”

ते पुढे म्हणाले, “राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदतीचे वाटप करण्यात येईल. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवून तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत आणि प्रस्ताव सादर करावा. अहवाल मिळाल्यानंतर कोणतीही विलंब न करता नुकसान भरपाई दिली जाईल.”

गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात सततच्या पावसाने शेती पाण्याखाली गेली असून अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. याची गंभीर दखल घेत कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला वेळ न दवडता कृती करण्याचे निर्देश दिले.

या दौऱ्यात कृषिमंत्र्यांसोबत आमदार नारायण कुचे, महसूल, कृषी, पशुसंवर्धन विभागांचे अधिकारी, तसेच कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेवटी, “संकटाच्या काळात शासन तुमच्या सोबत आहे, आणि या लढ्यात तुम्ही एकटे नाही,” अशा शब्दांत कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DattatrayBharne#jalna
Previous Post

विंडीजविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघात ‘या’ १५ खेळाडूंना संधी!

Next Post

अजित पवारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी!

Next Post
अजित पवारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी!

अजित पवारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.