DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर तूर्तास तातडीने ब्रेक! – कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा.

DD News Marathi by DD News Marathi
September 25, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
कृत्रिम फुलांच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला दत्तात्रय भरणे यांचा दिलासा! !

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. २५ सप्टेंबर २०२५

मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी व अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं पाण्याखाली गेली असून, अनेकांची शेती, जनावरे, घरं यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कर्जबाजारीपणाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये बँकांकडून कर्जवसुली तात्काळ थांबवण्यात येणार आहे, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाने विक्रमी हजेरी लावली आहे. मराठवाड्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या १२४ टक्के पाऊस पडला आहे. २२ सप्टेंबरपर्यंत सरासरी ६०४ मिमी पाऊस होत असतो. मात्र आता ७४७ मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा १६५ टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे. त्यानंतर आता कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर, काही बँका थकबाकीदार शेतकऱ्यांवर वसुलीचा तगादा लावत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत होत्या. यावर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, “ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं आहे, तिथे कर्जवसुली तत्काळ थांबवली पाहिजे. यासंदर्भात राज्य सरकार लवकरच बँकांना अधिकृत सूचना देणार आहे.”

शेतकऱ्यांचं सर्वस्व या नैसर्गिक आपत्तीने हिरावून नेलं असताना, सरकारने उचललेलं हे पाऊल त्यांच्या मानसिक आणि आर्थिक आधारासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कर्जवसुली थांबवण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांना सावरायला थोडीफार मदत करणारा ठरणार आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DattatrayBharne#HeavyRains
Previous Post

अजित पवारांकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी!

Next Post

वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४५ कोटी ३५ लाख ४३ हजार रुपयांची मदत जाहीर!

Next Post
वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४५ कोटी ३५ लाख ४३ हजार रुपयांची मदत जाहीर!

वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १४५ कोटी ३५ लाख ४३ हजार रुपयांची मदत जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.