DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नासने लावला सुरुंग?

'मी पुन्हा येईन' हे विधान खरे होणार?

DD News Marathi by DD News Marathi
June 24, 2022
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नासने लावला सुरुंग?

मुंबई प्रतिनिधी :

दि. 24 जून 2022

महाराष्ट्रात अचानक झालेल्या प्रचंड अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे चर्चांना आणि मत मतांतरांना उधाण आले आहे. ‘मी पुन्हा येईन’ अशी विश्वासपूर्ण गर्जना करणार्‍या फडणविसांचे नाव त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे पुन्हा एकवार चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले. या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच आहेत असे जणू एकमत सर्वत्र जाणवते आहे.

त्यावर कळस म्हणजे नुकतीच शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी इतर आमदारांसह केलेली बंडखोरी! या बंडखोरीचे पडसाद महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये उमटत आहेत परंतु खुद्द शिवसेना आणि मा. शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यामुळे पुरती हलली आहे असेच चित्र आहे. कारण एकनाथ शिंदेंनी बंडखोरीच्या कारणांमध्ये शिवसेनेने नको त्या पक्षांबरोबर केलेली युती आणि शिवसेनेच्या तत्त्वांची केलेली पायमल्ली ही कारणे प्रामुख्याने सांगितली आहेत.

मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तरी कर्ते करविते कोण आहेत याचे अंदाज कायमच बांधले जात होते. तशी कुजबूज ही कुणापासून लपलेली गोष्ट नाही. याच बाबत पुढे जाऊन अशी चर्चा रंगल्याचेही समजते की मा. शरद पवारांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नास असलेल्या मा. देवेंद्र फडणवीस यांनी मात दिली आहे आणि ‘मी पुन्हा येईन’ या वचनाच्या दिशेने त्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरू झाली आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DevendraFadnavis#SharadPawar #Maharashtra
Previous Post

पुण्याच्या ‘नेशन फर्स्ट’ प्री-स्कूलमध्ये बाळगोपाळांनी अनुभवली प्रतिकात्मक दिंडी

Next Post

बीजेपी म्हणते, महाराष्ट्रातल्या राजकीय संकटाशी काहीही संबंध नाही.

Next Post
बीजेपी म्हणते, महाराष्ट्रातल्या राजकीय संकटाशी काहीही संबंध नाही.

बीजेपी म्हणते, महाराष्ट्रातल्या राजकीय संकटाशी काहीही संबंध नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.