DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे

तरुण, सुशिक्षित उमेदवार विरुद्ध सध्याचे उदासीन सत्ताधारी असा सामना रंगणार

DD News Marathi by DD News Marathi
August 3, 2022
in राजकीय
0
खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे

पुणे प्रतिनिधी :

दि. 03 ऑगस्ट 2022

खानापूर गाव पुण्यासारख्या अतिशय प्रगत शहरापासून अगदीच जवळ तरी त्याची कुठलीही झलक या गावाच्या विकासात दिसत नाही. गावाच्या प्रगतीची काळजी सत्ताधार्‍यांना आहे किंवा गावाच्या कल्याणाशी कुणाला काही देणं घेणं आहे असा पुसटसा पुरवादेखील सगळं गाव पालथं घातलं तरी सापडत नाही.

शिक्षणाच्या सुविधा, आरोग्य सुविधा, मूलभूत सुविधा या सगळ्यापासून खानापूर गाव वंचित आहे. सत्ताधार्‍यांचा नाकर्तेपणा, इच्छाशक्तीचा अभाव आणि गावाच्या प्रगतीबाबत कमालीची उदासीनता याला कारणीभूत आहे असे दिसते.

या पार्श्वभूमीवर, गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या, सुधाकर बबन गायकवाड आणि त्यांच्या नेतृत्त्वाखालील ‘श्रीकाळभैरवनाथ आणि श्रीनाथ म्हस्कोबा परिवर्तन ग्रामविकास’ पॅनल’च्या सर्व तरुण आणि सुशिक्षित उमेदवारांनी गावाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा निर्धार केलाय. म्हणूनच या समविचारी तरुणांनी ‘श्रीनाथ व श्री काळभैरवनाथ ग्रामपरिवर्तन विकास’ पॅनलची निर्मिती केली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून ते जनतेसमोर येत आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासाचा आणि उन्नतीचा ध्यास उराशी बाळगलेल्या तरुणांच्या या पॅनलला गावकर्‍यांनी साथ द्यावी अशी तळमळीची भावना या उमेदवारांशी बोलताना जाणवली.

गावकरी आता सत्तापरिवर्तनासाठी तयार असल्याचे वातावरण सर्वत्र दिसून आले. ‘श्री काळभैरवनाथ आणि श्रीनाथ म्हस्कोबा परिवर्तन ग्रामविकास’ पॅनलचे तरुण आणि सुशिक्षित उमेदवार विरुद्ध सध्याचे उदासीन सत्ताधारी असा हा सामना असल्याने खानापूरचे ग्रामस्थ या पॅनलच्या उमेदवारांना पसंती देतील असे चित्र सर्वत्र दिसते आहे.

 

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का

Next Post

4 ऑगस्ट रोजी संपन्न होणार्‍या टाकळी हाजी ग्रामपंचायत 2022-2027 च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘मळगंगा ग्रामविकास पॅनल’चा विजय निश्चित

Next Post
4 ऑगस्ट रोजी संपन्न होणार्‍या टाकळी हाजी ग्रामपंचायत 2022-2027 च्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘मळगंगा ग्रामविकास पॅनल’चा विजय निश्चित

4 ऑगस्ट रोजी संपन्न होणार्‍या टाकळी हाजी ग्रामपंचायत 2022-2027 च्या पंचवार्षिक निवडणुकीत 'मळगंगा ग्रामविकास पॅनल'चा विजय निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.