हवेली प्रतिनिधी :
दि. १६ डिसेंबर २०२२
येत्या १८ डिसेंबरला विविध ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होत आहेत. कदमवाकवस्ती पंचवार्षिक सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत नवपरिवर्तन पॅनल बाजी मारणार असे ग्रामस्थांशी बोलताना जाणवले. ‘नवपरिवर्तन पॅनल’च्या गौरी चित्तरंजन (नाना) गायकवाड या २०१७ ते २०२२ दरम्यान इथे सरपंच असताना गावाने लक्षणीय प्रगती केल्याचे ग्रामस्थ जाणून आहेत. त्यांना चित्तरंजन नाना गायकवाड यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आता स्वतः चित्तरंजन (नाना) त्रिंबक गायकवाड हे सरपंचपदासाठी निवडणूक लढवित असल्याने निकाल काय लागणार याबाबत ग्रामस्थांमध्ये दुमत नाही असे जाणवले. ग्रामस्थांशी संवाद साधला असता, लवकरच सुरू होणारी पाणीपुरवठा योजना आणि इतर बरीच विकासकामे नवपरिवर्तन पॅनलच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलतील असे जाणवले. कदमवाकवस्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी तब्बल ९० कोटींची पाणीपुरवठा योजना नवपरिवर्तन पॅनलच्या गौरीताईंनी यशस्वीपणे मंजूर करून घेतल्याने ग्रामस्थ अतिशय उत्साही आणि आनंदी आहेत. गावातील समाजकंटक आणि विघ्नसंतोषी प्रवृत्तींविरुद्ध त्यांच्यात तीव्र नाराजी असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सकारात्मक आणि विधायक विचारसरणीच्या नवपरिवर्तन पॅनलला विजयी करण्याच्या पक्क्या मानसिकतेत ग्रामस्थ असल्याचे दिसते.