DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नारायण राणे-किरण सामंतांच्या उमेदवारीचा तिढा कायम!

उमेदवारीचा अंतिम निर्णय दिल्लीत.

DD News Marathi by DD News Marathi
April 15, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
नारायण राणे-किरण सामंतांच्या उमेदवारीचा तिढा कायम!

रत्नागिरी प्रतिनिधी :
दि. १५ एप्रिल २०२४

किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहेत. त्यांनी काल (रविवारी) नागपूरला जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या जागेसाठी भेट घेतली. या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारीचा कुठलाही शब्द किरण सामंत यांना दिला नसल्याची माहिती आहे. किरण सामंत यांनी आपण शिवसेनेकडून नाही तर भाजपकडूनदेखील लढण्यास तयार आहोत असे सांगितल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सामंत यांना काही काळ शांत राहण्याच्या सूचना केल्या. शिवाय असेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा निर्णय दिल्लीतून होईल, .

प्रत्यक्षात किरण सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही आज उमेदवारी अर्ज घेतले. उमेवारी अर्ज नारायण राणे यांच्याकडूनदेखील घेण्यात आले आहेत. त्यामुळे या जागेवरील तिढा अजूनही सुटला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या जागेबाबतचा निर्णय त्यामुळे दिल्लीत होणार आहे.

किरण सामंत यांचे पदाधिकारी म्हणाले की, आम्ही अर्ज घेतला आहे कारण महायुतीचा उमेदवार असेल त्याचा प्रचार करण्याच्या सूचना आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे किरण सामंत यांना उमेवारी जाहीर झाली, तर तयारीत असावे म्हणून आम्ही अर्ज घेतले आहेत. कारण हा मतदारसंघ खूप मोठा आहे

उमेदवारीतून माघार घेत असल्याची पोस्ट किरण सामंत यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केली होती. मात्र, त्यांनी नंतर ती पोस्ट डिलीट केली. या जागेसाठी शिंदे गट आग्रही आहे असे त्यांचे बंधू मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. आपल्यामुळे एकनाथ शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. मात्र, याविषयी आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी ती डिलीट केली. दरम्यान, राज्यस्तरावर ज्या जागांच्या संदर्भात महायुतीत निर्णय होत नाहीत. त्या जागांसंदर्भात अंतिम निर्णय अमित शाह घेणार आहेत. त्यामुळे तेच रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात अंतिम निर्णय घेतील.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AmitShah#KiranSamant#NarayanRane#Ratnagiri
Previous Post

साहेबांच्या वक्तव्यामुळे सुनांचा सासुरवास वाढला!

Next Post

पहिल्या लढाईत मुख्यमंत्री शिंदेंनी मारली बाजी!

Next Post
पहिल्या लढाईत मुख्यमंत्री शिंदेंनी मारली बाजी!

पहिल्या लढाईत मुख्यमंत्री शिंदेंनी मारली बाजी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

फडणवीसांचा स्वतःच्या आमदारावर संताप!

December 10, 2025
“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

“धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर राज्यव्यापी आंदोलन!”

December 10, 2025
जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

जर्मन मेट्रोत सेलिब्रिटीच्या शेजारी बसला आणि नशीब फळफळले!

December 10, 2025
महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

महाराष्ट्रात EVM ची सुरक्षा पुरेशी वाटत नाही?

December 10, 2025
बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.