DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“जनतेचं भलं बघायचं नाही, फक्त भाषणं ठोकायची!”

'नागरिकशास्त्रा'वरून आढळराव-पाटील अन् कोल्हेंमध्ये जुंपली

DD News Marathi by DD News Marathi
April 17, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
“जनतेचं भलं बघायचं नाही, फक्त भाषणं ठोकायची!”

शिरूर प्रतिनिधी :
दि. १७ एप्रिल २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी लढत शिरूर लोकसभा मतदारसंघात होणार आहे. या मतदारसंघात त्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार याबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. शिवाय ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली आहे.

इथे अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. प्रचारादरम्यान ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

अशातच नागरिकशास्त्र विषयावरून आता या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी, नागरिकशास्त्रात खासदारांनी जनतेची कामंच करायची नसतात, फक्त भाषणं करायची हे चालणार नाही, असं म्हणत अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. आढळराव पाटलांच्या या टीकेला कोल्हेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ‘स्वत:च्या कंपन्यांचं भलं न बघता जनतेचं भलं बघायचं हेच नागरिकशास्त्र महत्त्वाचं असतं,’ असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला आहे.

खासदाराने निवडून गेल्यावर लोकांमध्ये यायचंच नसतं, त्यानं दिल्लीतच थांबायचं. लोकांच्या अडीअडचणीला सामोरं जायचं नाही हे कोल्हेंचं म्हणणं योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करून आढळरावांनी त्यांना नागरिकशास्त्राचा धडा दिला होता. ते म्हणाले, “नागरिकशास्त्रात खासदारांनी कामं न करता, फक्त भाषणं करायची, असं करून चालणार नाही.”

कोल्हेंनी आढळरावांच्या याच वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. कोल्हे म्हणाले, आढळराव पाटलांनी 2013 ला कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा निर्यातबंदी करावी, यासाठी संसदेत आवाज उठवला. पण शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने संसदेत निलंबनाची पर्वा न करता कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका मी मांडत राहिलो. दोघांमध्ये हाच फरक असल्याचे सांगत नेमकं कुठलं नागरिकशास्त्र पाहायचं? असा सवाल कोल्हे यांनी केला. नागरिकशास्त्रात भलं जनतेचं बघायचं असतं, स्वत:च्या कंपन्यांचे नाही, हेच नागरिकशास्त्र महत्त्वाचे आहे, असं म्हणत कोल्हेंनी आढळराव पाटलांवर शरसंधान केलं आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AdhalraoPatil#AmolKolhe#shirurlokasabha#SocialScience
Previous Post

आता पुण्यात होणार चौरंगी लढत!

Next Post

इंदापूरात अजित पवारांची मिश्किल टिप्पणी.

Next Post
इंदापूरात अजित पवारांची मिश्किल टिप्पणी.

इंदापूरात अजित पवारांची मिश्किल टिप्पणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.