DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

पतंग कटण्याचे संकेत म्हणूनच अकोल्यात पाठिंब्याचं नाटक!

वंचित'ने लगावला ओवेसींना टोला!

DD News Marathi by DD News Marathi
April 17, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
पतंग कटण्याचे संकेत म्हणूनच अकोल्यात पाठिंब्याचं नाटक!

अकोला प्रातिनिधी :
दि. १७ एप्रिल २०२४

मंगळवारी छत्रपती संभाजीनगर मधील सभेत एआयएमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना अकोला मतदारसंघातून एआयएमआयएमचा पाठिंबा जाहीर केला. यावर तिखट प्रतिक्रिया वंचित आघाडीचे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अफसर खान यांनी दिली आहे. संभाजीनगरातून एआयएमआयएमच्या पतंग गुल झाला आहे, म्हणूनच ओवेसी हे पाठिंबयाचे नाटक करत असल्याचा आरोप खान यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात काँग्रेसचे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. इम्तियाज जलील आणि वंचितच्या समर्थकांमध्ये खान यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर वॉर रंगले होते. एकमेकांची छायाचित्रे पोस्ट करत दोन्ही बाजूंनी चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार सुरू झाला.

दरम्यान तीन दिवसांपासून संभाजीनगरात मुक्कामी असलेल्या ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी शहागंज येथील सभेत प्रकाश आंबेडकर यांना अकोला लोकसभा मतदारसंघात पाठिंबा जाहीर केला. यामागे एआयएमआयएमचा, प्रकाश आंबेडकर यांना मानणारा दलित समाज आणि त्यांची मते आपल्याकडे वळवण्याचा डाव असल्याचे बोलले जाते.

अद्याप ‘एआयएमआयएम’ने जाहीर केलेल्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकर किंवा ‘वंचित’च्या कुठल्याही राज्यस्तरावरील नेत्यांनी अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करणे म्हणजे एमआयएमची नौटंकी असल्याचे ‘वंचित’चे संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार अफसर खान यांनी म्हटले आहे.

हिंदू मतांमध्ये झालेले विभाजन गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्या पथ्यावर पडले होते. परंतु इम्तियाज जलील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कुठल्याच प्रकारचा विकास केलेला नाही. शिवाय दलित बांधवांची एकगठ्ठा मते जी वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना मिळाली होती, ती त्यांच्यापासून दूर गेली आहेत.

त्यामुळे आता पतंगाची हवा गुल झाल्याचा अंदाज छत्रपती संभाजीनगरातून ओवेसी आणि त्यांच्या स्थानिक नेत्यांना, खासदाराला आला आहे. म्हणूनच त्यांनी न मागता प्रकाश आंबेडकर यांना एकतर्फी पाठिंबा जाहीर करून नाटक केले आहे. परंतु त्यांच्या या खेळीला, वंचित बहुजन आघाडीला मानणारा गोरगरीब, वंचित घटक आणि वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीत बळी पडणार नाही आणि इम्तियाज जलील यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अफसर खान यांनी दिला.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AfsarKhan#AIMIM#AkolaLokasabha#AsaduddinOwaisi#ImtiyazJalil#VanchitBahujanAghadi
Previous Post

इंदापूरात अजित पवारांची मिश्किल टिप्पणी.

Next Post

‘ध’ चा ‘मा’ करण्याचे कारण नाही!

Next Post
शिवतारेंना कोणत्या ज्येष्ठ नेत्याचा फोन?

'ध' चा 'मा' करण्याचे कारण नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.