DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला अण्णा हजारे यांचं एका वाक्यात उत्तर!

म्हणाले, "ज्या रंगाचा…!"

DD News Marathi by DD News Marathi
February 13, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
संजय राऊतांनी केलेल्या टीकेला अण्णा हजारे यांचं एका वाक्यात उत्तर!

नगर प्रतिनिधी :
दि. १३ फेब्रुवारी २०२४

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ज्येष्ठ नगरसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका केली होती. अण्णा हजारे यांना महात्मा करण्याचं काम केजरीवाल, सिसोदिया यांनी केलं, नाहीतर ते राळेगणचे दैवत होते. शिंदे फडणवीस सरकार असताना अण्णा हजारे यांनी साधी कूसही बदलली नव्हती, असं संजय राऊत म्हणाले होते. या टीकेला अण्णा हजारे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

अण्णा हजारेंना महात्मा करण्याचं काम केजरीवाल, सिसोदिया यांनी केलं. नाहीतर त्यांनी कधी दिल्ली पाहिली असती? त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहित झाले, नाहीतर ते राळेगणचे दैवत होते. केजरीवाल आणि सिसोदियांनी भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईला तोंड फोंडलं, अण्णा हजारे त्याचे प्रतिक होते. त्यानंतर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, ते भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचं सरकार असेल त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही हे दुर्देवाने सांगायला लागत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

“ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे, जग दिसणारच तसं, आपण कशाला काय बोलायचं?” असं म्हणत अण्णांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. त्याआधी विधानसभेचा निकाल हा खोटा पराभव असून तो निकाल मी मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली, उद्धव ठाकरेंनी नाव न घेता अण्णा हजारेंवर टीका केली होती.

यावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली असून पत्रकारांनी सवाल केला म्हणून मी उत्तर दिलं. सगळ्यांनी त्याची प्रशंसा केली. एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्या. आपण कशाला त्यावर बोलायचे अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #annahajare#ArvindKejriwal#SanjayRaut#UddhavThackeray
Previous Post

दोन तासात १७ चिमुकल्या विद्यार्थिनींचा विनयभंग! नागपुरात संताप!

Next Post

माऊंटन बायकिंगमध्ये अहिल्यानगरच्या प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला कांस्यपदक!

Next Post
माऊंटन बायकिंगमध्ये अहिल्यानगरच्या प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला कांस्यपदक!

माऊंटन बायकिंगमध्ये अहिल्यानगरच्या प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला कांस्यपदक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.