DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

सासवडकरांची अवस्थाः “तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा”

आमदार संजय जगताप यांच्या सासवड शहरातच नागरिकांना वेळेवर प्यायला नाही पाणी

DD News Marathi by DD News Marathi
May 29, 2021
in ताज्या बातम्या
0
सासवडकरांची अवस्थाः “तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा”

दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यात सध्या विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यातील एकाही गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू नाहीत. याला अपवाद आहे फक्त एक गाव. ते म्हणजे सासवड. शहरात तीन चार दिवसांनी एखाद्या वेळेस तोही किरकोळ पाणीपुरवठा होत आहे. सासवडकर नागरिक मागील काही महिन्यांपासून त्यामुळे हैराण आहेत. तेंव्हा, या सर्व परिस्थितीला आमदार संजय जगताप कसे सामोरे जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

सासवडला नागरिकांमध्ये दहशत इतकी असते की याबाबत आवाजसुद्धा कुणी उठवत नाही. सामान्य माणसाचं सोडा, कुण्या पत्रकाराने यावर चार ओळी लिहिल्याचं आपण नजीकच्या कालावधीत पाहिलं नसेल. युट्यूब चॅनेलवाले तर इतकं लोटांगण घालतात की चार दिवसांनी पाणी मिळूनही सासवडकर कसे कमालीचे खुश आहेत हे सांगायलाही ते कमी करणार नाहीत.

विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे वीर धरणात तुडुंब पाणीसाठा आहे. नीरा डावा आणि नीरा उजवा कालवा दुथडी भरून वाहत आहे. पण सासवड शहरात कधी चार दिवसांनी तर कधी पाच दिवसांनी नळाला पाणी येत आहे. अनेक सोसायट्या, दत्तनगर, इंदिरानगर व इतर वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तोही धड केला जात नाही अशी सामान्य माणसांची ओरड आहे. २४ तास पाण्याची पट्टी नागरिकांकडून वसूल केली जाते आणि पाणी मिळते आठवड्यातून एकदा …

दुथडी भरुन वाहणारे कालवे

आणि ते १२०० कोटी खर्च करणार होते …

पुरंदरचे आमदार संजय जगताप पदरचे १२०० कोटी खर्चून गुंजवणीचे पाणी तालुक्याला आणणार होते. त्याबाबत दीड वर्षात त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. तिकडे पाईपलाईनचं काम शिवतारेंनी सुरु केलं तरी इकडे आमदारांना पत्ता नव्हता. आता तर परिस्थिती इतकी भयाण आहे की आमदारांच्या गावातच प्यायला पाणी नाही. वापरायच्या पाण्याची गोष्ट तर दूरच. लोक स्वतःच्या पैशाने टँकर विकत घेत आहेत. ग्रामीण भागात पाहायला मिळणारी वणवण आता सासवड शहरात पाहायला मिळत आहे.

हा सगळा मामला बघून एक गाणं आठवल्याखेरीज राहत नाही,
‘तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा’

बातमी नक्की शेअर करा
Previous Post

विश्वास बसणार नाही, महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्याची पत्नी होती सुप्रसिद्ध अभिनेत्री

Next Post

आता पुढचा नंबर अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांचा

Next Post
आता पुढचा नंबर अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांचा

आता पुढचा नंबर अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.