DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कमबख्त को यूपी भेज दो, उपचार कर देगें! – योगी आदित्यनाथ.

योगी आदित्यनाथांची अबू आजमींना सणसणीत चपराक!

DD News Marathi by DD News Marathi
March 6, 2025
in ताज्या बातम्या, राजकीय
0
कमबख्त को यूपी भेज दो, उपचार कर देगें! – योगी आदित्यनाथ.

डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०६ मार्च २०२५

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अबू आझमींच्या या विधानानंतर राज्यभरात पडसाद उमटले होते. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीउत्तर प्रदेश विधानसभेतून अबू आझमी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अबू आझमींना पक्षातून हकलून द्या…तसेच कमबख्त अबू आझमींना एकदा उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही उपचार करु…असा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमींवर केला आहे. तसेच अबू आझमींना भारतात राहण्याचा अधिकार आहे का?, याचं उत्तर समाजवादी पार्टीने द्यावे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. समाजवादी पक्षाला भारताच्या वारशाचा अभिमान नाही, किमान ज्यांच्या नावाने ते राजकारण करतात त्यांचे तरी ऐकले पाहिजे. डॉ. लोहिया म्हणाले होते की भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे भारतीय संस्कृतीचा आधार आहेत. आज समाजवादी पक्ष डॉ. लोहिया यांच्या तत्वांपासून दूर गेला आहे. आज त्यांनी औरंगजेबाला आपला आदर्श म्हणून स्वीकारले आहे. औरंगजेबाचे वडील शाहजहान यांनी लिहिले होते की, देवाने अशी मुले कोणालाही देऊ नयेत, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

अबू आझमी यांना औरंगजेबाच उदात्तीकरण करणं भोवलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत सपा आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच सदस्यत्व रद्द करा अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यांनी औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हटलं होतं. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत आझमी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

अबू आझमी यांनी म्हटलं होतं की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती. एवढंच नाही तर त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के होता त्याच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हणायचे.संभाजी महाराज आणि औरंगजेबमधील लढाई सत्ता मिळवण्यासाठीची होती. त्यांच्यात धर्माची नाही तर, सत्तेसाठी लढाई झाली, असे त्यांनी म्हटले होते.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AbuAzmi#Aurangzeb#yogiadityanath
Previous Post

मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही!

Next Post

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाकिस्तानबाहेर!

Next Post
चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाकिस्तानबाहेर!

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल पाकिस्तानबाहेर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर संशयाचे सावट?

February 17, 2026
अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

अजितदादांच्या अकाली निधनानंतर काही वेळातच मंत्रालयात अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची खिरापत!

February 17, 2026
राजपाल यादव यांना दिलासा!

राजपाल यादव यांना दिलासा!

February 16, 2026
अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत महत्त्वाची माहिती!

February 16, 2026
मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महत्त्वपूर्ण बैठक!

February 16, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी एआयला केंद्रस्थान; अजितदादांचे स्वप्न होणार पूर्ण! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

February 1, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.