DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

नितेश राणे आणि अनिल परब विधान परिषदेमध्ये एकमेकांना भिडले!

दोघांत जोरदार खडाजंगी. राणे आक्रमक.

DD News Marathi by DD News Marathi
March 7, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
नितेश राणे आणि अनिल परब विधान परिषदेमध्ये एकमेकांना भिडले!

मुंबई प्रतिनिधी :
दि. ०७ मार्च २०२५

अनिल परब यांनी केलेल्या विधानावरून विधान परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळतंय. सत्ताधारी मोठा गोंधळ घालताना दिसले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच माझाही छळ झाला असे थेट विधान अनिल परब यांनी केले होते. त्यांनी स्वत:ची तुलना संभाजी महाराजांसोबत केल्याने सत्ताधारी आक्रमक झाले. परबांविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्याविरोधात आंदोलनही करण्यात आले. राज्यपांलाच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान अनिल परब बोलत होते.

अनिल परबांच्या या विधानानंतर नितेश राणे सभागृहात आक्रमक झाले आणि त्यांनी परबांवर कारवाई करण्याची थेट मागणी केली. “छत्रपती संभाजी महाराजांसोबत यांनी स्वत:ची तुलना करावी का? अनिल परबांनी शिवभक्तांची माफी मागावी” असे नीतेश राणे म्हणाले. अनिल परबांच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेमध्ये मोठा गोंधळ झाला. यानंतर कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नितेश राणे आणि अनिल परब यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचेही बघायला मिळाले.

यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा देखील सभागृहात गाजला. विरोधीपक्षाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला की नाही? असा प्रश्न उपस्थित केला गेला. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात द्यायला हवी होती, असे विरोधकांनी यावेळी म्हटले आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी खडाजंगी देखील बघायला मिळाली. अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमाणे माझाही पक्ष बदलावा यासाठी छळ झाल्याचे म्हटले होते.

त्यावरूनच हा मोठा गदारोळ बघायला मिळतोय. परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. अनिल परब यांनी अगोदरच स्पष्ट केले की, मी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत बरोबर केली नाहीये. मात्र, यावरून सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे भैय्याजी जोशी यांनी मुंबईबद्दल केलेल्या विधानावरून संजय राऊत यांनी भाजपावर काही गंभीर आरोप केले. यासोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही सवालही केले.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AnilParab#ChhatrapatiSambhajiMaharaj#niteshrane
Previous Post

“संतोष देशमुखांना न्याय देण्याचं सुरेश धसांचं ध्येय नव्हतं!”

Next Post

मुंबईला महाराष्ट्रातून तोडायचा भाजपाचा डाव!

Next Post
मुंबईला महाराष्ट्रातून तोडायचा भाजपाचा डाव!

मुंबईला महाराष्ट्रातून तोडायचा भाजपाचा डाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.