DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मुकेश अंबानी यांचेकडून ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा!

भारतीय सशस्त्र दलाचे कौतुक केले.

DD News Marathi by DD News Marathi
May 12, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
मुकेश अंबानी यांचेकडून ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा!

मुंबई प्रतिनिधी :
दि. १२ मे २०२५

मुकेश अंबानी यांनी भारतीय सशस्त्र दलाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक देखील केलं. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर हे विधान केलं. सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना या ऑपरेशनच्या माध्यमातून चोख उत्तर देण्यात आलं, असं मानलं जातं. त्यामुळे देशभरात एकतेची भावना निर्माण झाली आहे. अंबानींनी त्यांच्या शब्दांतून कोट्यवधी भारतीयांच्या भावना व्यक्त केल्या, जे नागरिक देशाच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत देशासोबत आहेत.

मुकेश अंबानी यांनी यासंदर्भात पुढील निवेदन दिले आहे – “ऑपरेशन सिंदूर’साठी आम्हाला आमच्या भारतीय सशस्त्र दलांचा खूप अभिमान आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या संकटाविरुद्ध भारत एकजुटीनं आणि खंबीरपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी आणि निर्णायक नेतृत्वाखाली, भारतीय सशस्त्र दलांनी सीमेपलीकडून होणाऱ्या प्रत्येक चिथावणीला अचूक आणि शक्तिशाली प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने दाखवून दिलं आहे की, भारत दहशतवादाच्या विषयावर शांत बसणार नाही आणि आपल्या भूमीवर, आपल्या नागरिकांवर किंवा आपल्या राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या शूर पुरुष आणि महिलांवर एकही हल्ला आपण सहन करणार नाही. प्रत्येक धोक्याला दृढ आणि निर्णायक कारवाईने तोंड दिलं जाईल, हे गेल्या काही दिवसांत सिद्ध झालं आहे. रिलायन्स कुटुंब देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी कोणत्याही उपाययोजनांना पाठिंबा देण्यास तयार आहे. भारत शांतता इच्छितो, परंतु अभिमानाच्या, सुरक्षिततेच्या किंवा सार्वभौमत्वाच्या विषयावर शांत बसणार नाही.

आम्ही एकत्रितपणे उठाव करू. आम्ही लढू.आणि आम्ही जिंकू.

जय हिंद!

जय हिंद की सेना!”

अंबानी यांचे हे विधान केवळ एक व्यावसायिक विधान नाही, तर यातून राष्ट्रीय एकता आणि समान ध्येयाच्या भावनेचे दर्शन घडते. देशासाठी हा कठीण काळ आहे, अशा स्थितीत मुकेश अंबानी यांच्या शब्दांतून एक सामूहिक भावना समोर आली आहे, ती म्हणजे शांतता, सुरक्षा आणि आपल्या सैनिकांचा आदर हे भारताच्या धैर्याचे प्रतीक आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #IndiaPakWar#MukeshAmbani#OperationSindoor
Previous Post

पाकच्या विनंतीवरून भारताकडून शस्त्रसंधी!

Next Post

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट!

Next Post
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांची भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या भूमिकेत ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडे! 

‘धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या भूमिकेत ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडे! 

May 13, 2025
ऑपरेशन सिंदूर नंतर अमिताभ बच्चन यांचे एकानंतर एक ट्विट!

ऑपरेशन सिंदूर नंतर अमिताभ बच्चन यांचे एकानंतर एक ट्विट!

May 13, 2025
बेलुरा गावातील रस्त्याचे काम व पुलाचे बांधकाम रखडले!

बेलुरा गावातील रस्त्याचे काम व पुलाचे बांधकाम रखडले!

May 12, 2025
अवकाळी पावसामुळे नांदेडच्या स्थलांतरित कौठा बस स्थानकात चिखल. 

अवकाळी पावसामुळे नांदेडच्या स्थलांतरित कौठा बस स्थानकात चिखल. 

May 12, 2025
रतनपूर शेत शिवारातील तीन एकर संत्रा बागेवर चालविली कुर्‍हाड.

रतनपूर शेत शिवारातील तीन एकर संत्रा बागेवर चालविली कुर्‍हाड.

May 12, 2025
शिराजगाव कसबा येथे नादुरुस्त पिण्याच्या टाकीतून दूषित पाणी पुरवठा.

शिराजगाव कसबा येथे नादुरुस्त पिण्याच्या टाकीतून दूषित पाणी पुरवठा.

May 12, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.