DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

मेकअप करून बळेच भाकऱ्या भाजायच्या अन् शोऑफ करायचा!

मिरवण्यासाठी वारीत जाणाऱ्यांवर शुभांगी गोखलेंचा संताप.

DD News Marathi by DD News Marathi
June 25, 2025
in ताज्या बातम्या, प्रेरणादायी, महाराष्ट्र
0
मेकअप करून बळेच भाकऱ्या भाजायच्या अन् शोऑफ करायचा!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २५ जून २०२५

आषाढ महिना जवळ आली की अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी आसुसतात ते शेकडो मैल अंतर पार करून कधी एकदा त्या विठूरायाला, त्या पंढरीराजाला डोळे भरून पाहतो यासाठीच. पंढरपूरची वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी जणू दसरा-दिवाळीच, म्हणूनच तर प्रत्येक वारकरी या विठीमाऊलीच्या दर्शनासाठी डोळ्यांत प्राण आणून महिनाभर ऊन-वारा-पाऊस व थंडी अशा कोणत्याही संकटाची पर्वा न करता चालत राहातात. पण गेल्या काही वर्षात वारीचं रुप बदललंय. खरं तर मंदिरातला विठुराया तोच आहे, वारकरीही तेच आहेत, पण यात भर पडली आहे ती सोशल मीडियावर शोऑफ करणाऱ्यांची.

गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होऊन फोटोसेशन करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. यात राजकारणी, अभिनेते, अभिनेत्रींचाही समावेश असतोच. सिनेमे, मालिकांचं प्रमोशन वारीत केलं जातंय. अशा अनेक गोष्टी खटकणाऱ्या आहेत. यावर आता अभिनेत्री शुभांगी गोखले यांनीही पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.

शुभांगी गोखले या सोशल मीडियावर फार सक्रिय नसतात. पण काही महित्त्वाच्या मुद्द्यांवर मात्र त्या वेळोवेळी व्यक्त होत आल्या आहेत. आता वारीत मिरवणाऱ्या फोटोशूट करणाऱ्यांना त्यांनी सुनावलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय हे शुंभागी गोखले यांची पोस्ट?
खूप वर्षांपासून मनात येत राहातं.वारी वर्षानुवर्षं शांतपणे,शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडीची पाकीटं , केळी वाटायची, मेकअप करून त्या अन्नपूर्णांच्यामध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या.. असे अनेक प्रकार करून त्या भक्तीपूर्ण वातावरणाचा विचका करायचा.. कशासाठी? असं शुभांगी गोखले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.

त्या पुढं म्हणतात की, काही दिवसांत “काजवा महोत्सव” नामक प्रकार सुरू होईल. त्यांचा हा मिलनाचा काळ..मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तिला आकर्षित करत असतात. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत,टॉर्चेसचा प्रकाश न् बडबड करून घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा.. खूप लिहायचंय . पण उद्विग्नतेमुळे थकले. रामकृष्ण हरी.पांडुरंगा.. सांभाळ रे..

शुभांगी गोखले यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.यावर अनेक नेटकऱ्यांनी सहमत असल्याच्या कमेंट्सही केल्या आहेत.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #pandharivari#shubhangigokhale#socialmedia
Previous Post

प्राजक्त तनपुरेंची कारखान्याच्या निवडणूकीत सरशी!

Next Post

‘तो माझा क्रश होता आणि…’ झीनत अमान यांनी गुपित उलगडलं!

Next Post
‘तो माझा क्रश होता आणि…’ झीनत अमान यांनी गुपित उलगडलं!

'तो माझा क्रश होता आणि...' झीनत अमान यांनी गुपित उलगडलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.