DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

हिंजवडीच्या सरपंचांवर अजितदादांचा संताप.

DD News Marathi by DD News Marathi
July 26, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर-हैदरबादला चाललंय!

पुणे प्रतिनिधी :
दि. २६ जुलै २०२५

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सकाळी लवकर अनेकदा आपल्या पाहणी दौऱ्यावर जातात. त्यामुळे अधिकाऱ्यांसह सर्वांचीच तारांबळ उडालेली पाहायला मिळते. हिंजवडीमध्ये नागरी समस्या आणि विकास कामांच्या सुरुवातीची माहिती घेण्यासंदर्भात अजित दादा दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा पाहाणीसाठी आले होते. जो कोण मध्ये येईल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश या भेटी दरम्यान दादांनी दिले. दादांनी सर्वांसमोर त्यावेळी हिंजवडी गावचे सरपंच यांना झापल्याचं दिसून आलं. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून दादा इतके आक्रमक का झाले होते हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

“कोणीही मध्ये आलं की ३५३ लावायचं. अजित पवार मध्ये आले तरी लावायचं. त्याशिवाय हे काम होणार नाही.आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे.” असं विकास कामांची माहिती घेत असताना अजित पवार म्हणाले. त्यानंतर हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी रस्त्यामध्ये मंदिरात येत असल्याचं सांगितलं. त्यानंतर दादा आक्रमक झाले आणि सरपंचांना सर्वांसमोरच खडे बोल सुनावले.

“अहो असू द्या हो साहेब, धरणं करताना मंदिर जातातच ना! तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो, मी काय करायचे ते करतो. आपलं वाटोळं झालं, माझ्या पुण्यातून-महाराष्ट्रातून हिंजवडीचं सगळं आयटी पार्क बंगलोर- हैदराबादला बाहेर चाललं. तुम्हाला काय पडलं नाही. कशाला मी सहा वाजता येतो मला कळत नाही.” असं अजित पवार आक्रमकपणे म्हणाले. दादांना ज्यावेळी दिसलं की माध्यमांचे कॅमेरे चालू आहेत तेव्हा त्यांनी, कॅमेरे बंद करायला संगितले.

हिंजवडी परिसरात मोठे आयटी पार्क आणि अनेक कंपन्या आहेत. त्यामुळे देशभरातून लोक त्या भागात नोकरीसाठी येत आहेत. तिथे वाहतूक आणि नागरी समस्याही वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत आहेत. मागील पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले होते. हिंजवडी येथे राष्ट्रीय महामार्ग असल्या कारणाने पुणेकरांना गर्दीचा खूप त्रास सहना करावा लागत आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AjitDadaPawar#Hinjawdi#Sarpanch
Previous Post

लाडकी बहीण योजनेचा लाभ १४ हजारहून अधिक पुरुषांनी लाटला !

Next Post

पुण्यात आणखी एक रेव्ह पार्टी प्रकरण!

Next Post
पुण्यात आणखी एक रेव्ह पार्टी प्रकरण!

पुण्यात आणखी एक रेव्ह पार्टी प्रकरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.