DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

ठाकरे बंधूंच्या युतीचा फज्जा, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकही जागा नाही!

पराभवामागील कारणांची चर्चा.

DD News Marathi by DD News Marathi
August 20, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
ठाकरे बंधूंच्या युतीचा फज्जा, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत एकही जागा नाही!

मुंबई प्रतिनिधी :
२० ऑगस्ट २०२५

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीकडे या वर्षी विशेष राजकीय लक्ष लागले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोन बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र येत निवडणुकीत “उत्कर्ष” नावाने युती पॅनेल सादर केलं होतं. मात्र या बहुचर्चित पॅनेलचा संपूर्ण पराभव झाला असून, त्यांना एकही जागा मिळालेली नाही.

जुन्या लोकप्रियतेला झळ, युती फसली

गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत होती. ती इच्छा या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्ण झाली खरी, पण अपेक्षित प्रभाव दिसला नाही. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला मतदारांनी स्पष्ट नकार दिला.

वरिष्ठ नेत्यांची प्रचारात गैरहजेरी आणि अंतर्गत मतभेद

या पराभवामागे अनेक कारणं स्पष्ट होत आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे, ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मनसेचे काही नेते प्रचारात सक्रीय होते, पण उद्धव ठाकरे गटाकडून कुणीच दिसला नाही. त्यामुळे प्रचाराच्या आघाडीवर पॅनेल मागे राहिलं.

याशिवाय, काही उमेदवारांवरून शिवसेना (ठाकरे गट) अंतर्गतरित्या दुभंगली होती. या मतभेदांचाही निवडणुकीवर नकारात्मक परिणाम झाला.

भ्रष्टाचाराचे आरोप आणि लोकांचा रोष

निवडणुकीच्या ऐन तोंडावर जुन्या संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याची चौकशी सुरू झाली. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी वाढली. शिवसेनेने महापालिकेत सत्तेचा अनुभव असूनही कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका देखील या पराभवाचं कारण ठरला.

निष्कर्ष काय?

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने बाजी मारली असून त्यांनी १४ जागा जिंकल्या. प्रसाद लाड यांच्या पॅनेलने सात जागा मिळवल्या. ठाकरे बंधूंच्या युती पॅनेलला मात्र एकही जागा मिळवता आलेली नाही.

थोडक्यात काय तर ठाकरे बंधूंच्या पहिल्याच युती प्रयोगाला मतदारांनी नाकारलं असून, प्रचारातील हलगर्जीपणा, अंतर्गत मतभेद, वादग्रस्त उमेदवार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पॅनेलच्या पराभवात मोठा वाटा राहिल्याचं स्पष्ट झालं आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #BEST#RajThackeray#UddhavThackeray
Previous Post

कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला जोरदार धक्का!

Next Post

आयसीसीच्या वनडे क्रमवारीतून रोहित-कोहली गायब!

Next Post
आयसीसीच्या वनडे क्रमवारीतून रोहित-कोहली गायब!

आयसीसीच्या वनडे क्रमवारीतून रोहित-कोहली गायब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.