DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

अंजली दमानियांचा एकनाथ शिंदेंबद्दल धक्कादायक दावा, चर्चेला उधाण!

सप्टेंबरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ? 

DD News Marathi by DD News Marathi
August 21, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
अंजली दमानियांचा एकनाथ शिंदेंबद्दल धक्कादायक दावा, चर्चेला उधाण!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २१ ऑगस्ट २०२५

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले असताना, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

“सप्टेंबरपर्यंत शिंदेंचा राजकीय भाव चढेल”

दमानिया म्हणाल्या, की “सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचा राजकीय ‘भाव’ या काळात वाढताना दिसेल,” असा दावा त्यांनी केला. हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे.

उपराष्ट्रपती निवडणूक आणि फडणवीसांची भूमिका

त्याचबरोबर, केंद्रात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएतील विसंवादाच्या चर्चांनाही त्यांनी दुजोरा दिला. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीतील नेत्यांशी समन्वयाची भूमिका देण्यात आली असावी, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे–फडणवीस भेट आणि उद्धव ठाकरेंवर टिका

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला अपयश आल्यावर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांची भेट घेतली. यावर बोलताना, अंजली दमानिया म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांना काहीही भविष्य दिसत नाही, त्यामुळेच ते भाजपच्या जवळ जात आहेत. ते आपला राजकीय ‘भाव’ वाढवत आहेत, पण उद्धव ठाकरेंशी त्यांना प्रत्यक्ष युती करायची इच्छा नाही.”

त्यांनी पुढे टोला लगावत म्हटलं, “राज ठाकरे हे एक दिवस उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील, ही वेळ फक्त येण्याची वाट पाहत आहे.”

राजकीय हालचालींना वेग

राज्यात निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय गठजोड, रणनीती, आणि नेत्यांतील हालचालींना वेग आला आहे. अशात दमानियांच्या वक्तव्याने अनेक नव्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना हात मिळाला आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #AnjaliDamania#EknathShinde
Previous Post

८ लाख हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती!

Next Post

अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना पुणे कोर्टात हजार राहाण्याचे आदेश!

Next Post
अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना पुणे कोर्टात हजार राहाण्याचे आदेश!

अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना पुणे कोर्टात हजार राहाण्याचे आदेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्यांनी हताश होऊ नये, सरकार त्यांच्या पाठिशी आहे” – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही!

“शेतकऱ्यांनी हताश होऊ नये, सरकार त्यांच्या पाठिशी आहे” – पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही!

August 21, 2025
मुंबईच्या जीएसबी गणेश मंडळाचा विक्रमी निर्णय – तब्बल ₹४७४ कोटींचं विमा संरक्षण!

मुंबईच्या जीएसबी गणेश मंडळाचा विक्रमी निर्णय – तब्बल ₹४७४ कोटींचं विमा संरक्षण!

August 21, 2025
अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना पुणे कोर्टात हजार राहाण्याचे आदेश!

अक्षय कुमार व अर्शद वारसी यांना पुणे कोर्टात हजार राहाण्याचे आदेश!

August 21, 2025
अंजली दमानियांचा एकनाथ शिंदेंबद्दल धक्कादायक दावा, चर्चेला उधाण!

अंजली दमानियांचा एकनाथ शिंदेंबद्दल धक्कादायक दावा, चर्चेला उधाण!

August 21, 2025
८ लाख हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती!

८ लाख हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती!

August 21, 2025
हैद्राबादहून फिरायला आलेल्या तरुणाचा सिंहगडावरून घसरून पडल्याचा संशय!

हैद्राबादहून फिरायला आलेल्या तरुणाचा सिंहगडावरून घसरून पडल्याचा संशय!

August 21, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.