DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

कृत्रिम फुलांच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला दत्तात्रय भरणे यांचा दिलासा! !

पंकजा मुंडे यांना पाठविले पत्र.

DD News Marathi by DD News Marathi
August 28, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
कृत्रिम फुलांच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला दत्तात्रय भरणे यांचा दिलासा! !

मुंबई प्रतिनिधी :
दि. २८ ऑगस्ट २०२५ :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक फुलांना मागणी वाढत असताना बाजारात मोठ्या प्रमाणावर कृत्रिम फुलांचा वापर वाढला आहे. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असून त्यांना आर्थिक फटका बसतो आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढाकार घेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र पाठवून कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सव, तसेच इतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर फुलांचा वापर होतो. मात्र शेतकरी मेहनतीने पिकवत असलेल्या नैसर्गिक फुलांऐवजी बाजारात चीनमधून आयात केलेल्या प्लास्टिक व सिंथेटिक फुलांना मागणी वाढली आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यावर होत असून, त्यांना उत्पादन खर्चही परत मिळेनासा झाला आहे.

याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून परिस्थितीचे गांभीर्य मांडले आहे. त्यांनी पर्यावरण विभागामार्फत तातडीने कायदेशीर पावले उचलून कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.

कृत्रिम फुलांचा वाढता वापर फुलशेतीसाठी धोकादायक ठरतो आहे. शेतकऱ्यांची हरितगृहे रिकामी पडत आहेत, उत्पादन न विकल्याने नुकसान होते आहे, आणि संपूर्ण एक व्यवसाय संकटात आला आहे. शिवाय प्लास्टिक व सिंथेटिक पदार्थांमुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो आहे.

ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृत्रिम फुलांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करत कृषिमंत्री भरणे यांनी ठोस भूमिका घेतली आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे राज्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #agriculturalminister#DattaBharne#flowerfarming
Previous Post

महसूल विभागाने प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मागणी!

Next Post

दिवेआगरमधील सुपारी संशोधन केंद्राची कामे तातडीने सुरू करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

Next Post
दिवेआगरमधील सुपारी संशोधन केंद्राची कामे तातडीने सुरू करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

दिवेआगरमधील सुपारी संशोधन केंद्राची कामे तातडीने सुरू करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरार दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू!

विरार दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू!

August 28, 2025
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा होणार नाचक्की?

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा होणार नाचक्की?

August 28, 2025
मोहम्मद शमी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती?

मोहम्मद शमी क्रिकेटमधून घेणार निवृत्ती?

August 28, 2025
राष्ट्रीय क्रीडा दिन २०२५ – पुण्यात रंगणार ऐतिहासिक सोहळा!

राष्ट्रीय क्रीडा दिन २०२५ – पुण्यात रंगणार ऐतिहासिक सोहळा!

August 28, 2025
दिवेआगरमधील सुपारी संशोधन केंद्राची कामे तातडीने सुरू करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

दिवेआगरमधील सुपारी संशोधन केंद्राची कामे तातडीने सुरू करा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.

August 28, 2025
कृत्रिम फुलांच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला दत्तात्रय भरणे यांचा दिलासा! !

कृत्रिम फुलांच्या वापरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला दत्तात्रय भरणे यांचा दिलासा! !

August 28, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.