DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

२६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता!

शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला. काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत.

DD News Marathi by DD News Marathi
September 23, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
२६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता!

मुंबई प्रतिनिधी :
दि. २३ सप्टेंबर २०२५

राज्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पावसात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी आपली काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

२४ सप्टेंबरपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रात २८ सप्टेंबरपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

२२ ते २५ सप्टेंबरदरम्यान, काही भागांमध्ये वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून तो मुख्यतः दुपारनंतर होईल. विशेषतः २६ तारखेपासून विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व आणि दक्षिण भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

२७ सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर २८ तारखेला राज्याच्या पश्चिम भागांमध्येही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन योग्य प्रकारे करावे, तसेच काढणी केलेली पिके वाचवण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #farmers#HeavyRains#westmaharashtra
Previous Post

ठाणे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण शाखेने केली युरिया खत कारवाई!

Next Post

जीएसटी सुधारणा लागू होताच ३७५ वस्तूंवर दर कमी!

Next Post
जीएसटी सुधारणा लागू होताच ३७५ वस्तूंवर दर कमी!

जीएसटी सुधारणा लागू होताच ३७५ वस्तूंवर दर कमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यमूनानगर भूषण” पुरस्कार यंदा आप्पासाहेब काळोखे यांना

March 4, 2026

सुरक्षितता पाळणे ही सामाजिक जबाबदारी : अतुल गाडगीळ

March 4, 2026

March 4, 2026

पीएमआरडीएच्या आयुक्तपदी डॉ. अभिजीत चौधरी

March 4, 2026
एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआय फॉर ॲग्री २०२६ जागतिक परिषदेचे आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे महाराष्ट्रात आयोजन : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

February 19, 2026
महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे फुले कृषि महोत्सव उत्साहात संपन्न!

February 18, 2026
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.