DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

जालना जिल्ह्यातील बदनापूर व अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी.

“एकही गुंठा क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये. खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा.” - कृषि मंत्री दत्तात्रय भरणे

DD News Marathi by DD News Marathi
September 24, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
जालना जिल्ह्यातील बदनापूर व अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी.

जालना प्रतिनिधी :
दि. २४ सप्टेंबर २०२५

जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि अंबड तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि शेतीसंबंधित साधनसामग्रीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला.

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या पिकांचे नुकसान, पाण्यामुळे शेतात साचलेले गाळ आणि वाहून गेलेली जमीन याची माहिती मंत्र्यांना दिली. तसेच विहिरी, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांनाही फटका बसल्याचं निदर्शनास आलं.

या दौऱ्यात मंत्री भरणे यांनी प्रशासनाच्या कामकाजातील ढिलाईवर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून स्पष्ट शब्दांत निर्देश दिले.
“एकही गुंठा क्षेत्र पंचनाम्याविना राहता कामा नये. खरडून गेलेली जमीन, विहिरी, जनावरांचे नुकसान – सर्व बाबींचे पंचनामे तात्काळ पूर्ण करा. जर कोणी वंचित राहिला, तर त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल,” असा इशारा त्यांनी दिला.

शासनाची गंभीर दखल; युद्धपातळीवर पंचनामे सुरू

मंत्री भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त जालना जिल्ह्यातच ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान २ लाख ५५ हजार हेक्टर (सुमारे ६.३८ लाख एकर) शेतीचे नुकसान झालं आहे. यातील बहुतांश नुकसान सप्टेंबर महिन्यात झालं असून पावसाचा जोर जास्त असल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

राज्याच्या पातळीवर पाहता, ३३.५१ लाख हेक्टर म्हणजेच सुमारे ८३.७७ लाख एकर क्षेत्रावर अतिवृष्टीचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. या भागांमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे.

मुख्यमंत्र्यांचं लक्ष; शासन तात्काळ मदतीसाठी कटिबद्ध

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही राज्यातील विविध भागांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत असून, संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मंत्री भरणे म्हणाले की, “शेतकऱ्यांना न्याय मिळणं ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कुणालाही मदतीपासून वंचित ठेवणार नाही. पंचनामे पूर्ण होताच मदत तत्काळ वितरित केली जाईल,” असं आश्वासनही त्यांनी दिलं.

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DattatrayBharne#farmers#HeavyRains#jalna
Previous Post

संतप्त शेतकऱ्यांना कृषीमंत्र्यांचा दिलासा!

Next Post

अहिल्यानगरमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भातुर गावातील क्षेत्राची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी!

Next Post
अहिल्यानगरमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भातुर गावातील क्षेत्राची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी!

अहिल्यानगरमधील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भातुर गावातील क्षेत्राची कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंकडून पाहणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

हिंदी चित्रपट “स्त्री Talks” ची अधिकृत घोषणा

October 17, 2025
राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न!

October 17, 2025
‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

‘हा तर शिनचॅनच्या सूरात बोलणारा महाआगाऊ मुलगा!’ – स्वप्नील राजशेखर

October 17, 2025
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड, या योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

October 16, 2025
प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

प्रेमानंद महाराजांसाठी अभिनेता एजाज खान किडनी देण्यास तयार!

October 16, 2025
मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

मुंबईत चमत्कारिक प्रसंग! ट्रेन थांबवून तरुणाने केली महिलेची प्रसूती!

October 16, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.