DD News Marathi
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय
No Result
View All Result
DD News Marathi
No Result
View All Result

“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

आंबा, काजू, संत्रा पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

DD News Marathi by DD News Marathi
December 9, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर प्रतिनिधी :
दि. ०८ डिसेंबर २०२५

“आंबा, संत्रा आणि काजू पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत नोंदणी पडताळणी प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे सहभाग घेता आला नव्हता. त्यामुळे या विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील सर्व अधिसूचित जिल्ह्यांसाठी अंतिम मुदत वाढविण्याबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेऊन आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना या विमा योजनेत भाग घेण्यासाठी 15 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत वाढ दिली” असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्य शासनाच्या विनंतीनुसार विमा कंपन्यांचा आढावा घेतल्यानंतर बजाज अलियांझ जनरल इशुरन्स कंपनी लिमिटेड आणि जनरल सेंट्रल इशुरन्स कंपनी लिमिटेड यांनी या मुदतवाढीस मान्यता दिली आहे. युनिव्हर्सल सोंम्पो जनरल इशुरन्स कंपनी लिमिटेडयांनी NCIP पोर्टल सुरु झाल्यापासून पुढील सात दिवसांची मुदतवाढ लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यापैकी एआयसी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी त्यांच्या क्लस्टरमधील जिल्ह्यांसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला आहे.

“राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्र सरकारने रब्बी हंगाम 2025-26 साठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित आंबा, संत्रा व काजू पिकांसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी अंतिम मुदत वाढविण्यास मान्यता दिली आहे. वाढीव कालावधीत होणाऱ्या नोंदणीसाठी भारत सरकारचा प्रीमियम वाटा देखील देय राहील. वाढीव मुदतीत नैतिक जोखीम टाळण्यासाठी संचालन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त पात्र शेतकर्‍यांचा समावेश व्हावा यासाठी राज्य सरकारने ही माहिती सर्व नोंदणी केंद्रांना आणि माध्यमांना तात्काळ पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली

बातमी नक्की शेअर करा
Tags: #DattatrayBharne#farmers
Previous Post

कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

Next Post

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

Next Post
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

बायकोचा फोन आला अन् तरुणाने आत्महत्त्या केली!

December 9, 2025
नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

नोकरी मिळणार या आशेने लग्न केलेल्या किरणची आत्महत्त्या!

December 9, 2025
महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

महायुतीत महाकलह? कल्याण-पश्चिमेत संघर्ष चिघळला!

December 9, 2025
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा तापला!

December 9, 2025
“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

“आंबा, काजू, संत्रा पिक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदत वाढ” : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

December 9, 2025
कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

कष्टकऱ्यांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांना आज अंतिम निरोप!

December 9, 2025
Load More
  • Home

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • प्रेरणादायी
  • लेख-विश्लेषण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • संपादकीय

© 2021 Website maintain by Tushar Bhambare.