मुंबई प्रतिनिधी :
दि. 28 जून 2022
महाराष्ट्रातील राजकीय नाट्य शिगेला पोहोचलं आहे. एकीकडे शिवसेनेत बंडखोरी वाढत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे एकामागे एक त्यांचे आमदार फुटत चालले आहेत. त्यातच सरकार बनवण्याचे नवे नवे मार्ग समोर येत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोरांना बरोबर घेऊन सरकार बनवू शकते. आतल्या गोटातून अशीही माहिती समोर येते आहे की भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात सरकार बनवण्याच्या अटींवर विचारविमर्श चालू आहे.
जर भाजपा आणि बंडखोर यांचं एकत्र सरकार बनलं तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री बनवले जाणार असल्याचे समजते. तसेच शिंदे गटातल्या 8 आमदारांना कॅबिनेट मंत्री तर 5 जणांना राज्यमंत्री बनवलं जाऊ शकतं असंही सूत्रांकडून समजतं आहे. तसंच भाजपाच्या गोटातून 29 जण मंत्री बनू शकतात. एवढंच नाही तर एकनाथ शिंदेंचं असंही म्हणणं आहे की जे अपक्ष आपल्याबरोबर येतील त्यातल्या काहीजणांना भाजपाने आपल्या कोट्यातून मंत्री बनवावं.
पण हे सगळं होण्याआधी हा मोठा प्रश्न आहे की सरकार बनणार कसं? नव्या सरकारसाठी जुनं सरकार जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी फ्लोअर टेस्ट होणं आवश्यक आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्नच हा आहे की फ्लोअर टेस्ट साठी राज्यपालांकडे जाणार कोण?